
अहमदनगर (प्रतिनिधी ) : मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल युनियनच्या वतीने आमदार संग्राम जगताप व आयुक्त यशवंत डांगे यांचा सत्कार करून पेढे तुला करण्यात आली. महानगरपालिकेत ठराविकच अधिकारी कर्मचारी काम करत असून आता सर्वांनीच पुढे येऊन आपले शहर म्हणून भूमिका पार पाडावी आणि शहराला शिस्तबद्ध सवय लावण्यासाठी काम करावे,शहरातील काही राजकीय मंडळी समोर एक बोलतात आणि मागे एक करतात त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होण्यास उशीर झाला आहे.मनपाचे उत्पन्न आणि आस्थापना खर्च यामध्ये मोठी तफावत होती कागदपत्रांची पूर्तता करून राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावला, अनेक वर्षाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कर्मचारी युनियनचा संघर्ष सुरू होता त्याला अखेर यश आले आहे,
महापालिका कर्मचारी आणि आमचे अतूट नाते असून मी देखील महापालिकेत महापौर पदावर काम केले आहे. चांगल्या विचाराच्या लोकांनी एकत्र येऊन युनियनच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न मार्गी लावावे,असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे.यावेळी जल अभियंता परिमल निकम, प्रभारी उपायुक्त मेहर लहारे, ज्ञानदेव पांडुळे, अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, सचिव आनंद वायकर, राहुल साबळे उपस्थित होते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगासाठी संघर्ष करावा लागला आहे, आता तो मिळाला असून उत्पन्न वाढीसाठी काम करावे लागणार आहे आपला मार्केट विभाग काय करतो हेच माहीत नाही, आपल्या कर्तव्याची माहिती सर्वांना पाहिजे,आपल्या संस्थेची प्रगती हीच कर्मचाऱ्यांची प्रगती आहे तरी मरगळ झटकून काम करा, शहरातील नागरिकांबरोबर चांगला सुसंवाद ठेवून चांगली नागरी सेवा देण्यासाठी काम करावे, कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याचा पगार सातवा वेतन आयोगासहित मिळणार आहे.या कामासाठी आमदार संग्राम जगताप, आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे प्रश्न मार्गी लागला आता केलेल्या कामातून उतराई होण्यासाठी सत्कार सोहळा व पेढे तुला या कार्यक्रमाचे आयोजन युनियनच्या वतीने करण्यात आले








