
प्रेस नोट
नवी दिल्ली
केंद्रीय जलशक्ती मंत्रालय,जलसंसाधन आणि नदी विकास, गंगा संरक्षण विभाग यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय जल पुरस्कार महाराष्ट्राने देशातील सर्वोत्कृष्ट राज्याचा पहिला क्रमांक पटकाविला आहे.
पाणी संवर्धन आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा सन्मान महाराष्ट्राला जाहीर झाला आहे.
या पुरस्कारात महाराष्ट्रासोबतच नवी मुंबई महानगरपालिकेने ‘ सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था ‘ या गटात प्रथम क्रमांक मिळविला, तर कानिफनाथ जल/पाणी वापर सहकारी संस्था, नाशिक यांनी, ‘ सर्वोत्कृष्ट जल/पाणी वापर संस्था’ या श्रेणीत द्वितीय क्रमांक पटकावला असल्याचे केंद्रिय जलशक्ती मंत्रालयाचे सचिव व्ही.एल. कांता राव यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांना पत्राद्वारे कळविले आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ १८ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पार पडणार असून राज्याला 🏆 ट्रॉफी, प्रशस्तीपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
राज्याच्या जलसंधारण, जलव्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवन क्षेत्रात करण्यात आलेल्या प्रयत्नांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा ( तापी विदर्भ व कोकण खोरे विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा( गोदावरी व मराठवाडा खोरे विकास महामंडळ), मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच जलसंपदा विभागाचे अभिनंदन केले आहे.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
All India Media Association
Nagpur District President
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015
