
प्रेस विज्ञप्ति
सह्याद्रि अतिथिगृह, मुंबई
मातंग समाजाच्या कल्याणासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न बार्टीच्या धर्तीवर ‘आर्टी’ संस्थेचे सक्षमीकरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मातंग समाजाच्या मागण्यांसंदर्भात बैठक पार पडली. मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. या समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून बार्टीच्या धर्तीवर ‘आर्टी’ (Annabhau Sathe Research and Training Institute) संस्थेचे सक्षमीकरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणासाठी निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची विनंती करण्यात येणार असून, मातंग समाजाच्या संघटनांनी आपल्या मागण्या लेखी स्वरूपात बदर समितीकडे सादर कराव्यात. या समितीच्या अहवालात आपल्या मागण्या समाविष्ट करता येतील. सन 2027 मध्ये होणाऱ्या जातनिहाय जनगणनेमध्ये लोकसंख्येच्या आधारे वर्गीकरणात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनेत जामीनदाराच्या अटी शिथिल करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. ‘आर्टी’ संस्थेसाठी वेगळे लेखाशीर्ष तयार करण्यात आले असून यासाठी पुरेसा निधी देण्यात येईल, तसेच आर्टी संस्थेचे मुख्यालय पुणे येथे करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
यावेळी मंत्री गिरीश महाजन, आ. सुनील कांबळे, आ. नामदेव ससाने, आ. अमित गोरखे व मातंग समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Vande Bharat live tv news,Nagpur
Editor
Indian council of Press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
HEAD OFFICE Plot no.18/19,Flat
no.201,Harmony emporise Payal –
pallavi society new Manish Nagar-
Somalwada-440015