
अहिल्यानगर प्रतिनिधी राविराज शिंदे
अहिल्यानगर शहरात वाहतुकीची कोंडी झाल्याबाबत सामाजिक समस्यांची विचारणा केली असता,तसेच त्या घटनेचे लाइव प्रक्षेपण फेसबुकवर केल्याने एका पोलीस महिलेने त्या घटनेचा मन:स्ताप झाल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.व तसा बिनबुडाचा आरोप करून निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या विधवा महिला जिल्हाध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शीतल गोरे यांचेवर पोलीस विभागाने गुन्हा दाखल केला आहे.गोरे यांचे जिल्हाभर व जिल्ह्याबाहेर नागरिकांच्या समस्या सोडवणे,सावकारीमुळे जप्त झालेल्या वाहनाची सोडवणूक करणे,जप्त होणारी घरे वाचवणे,तसेच अनेक पतसंस्था,बँकेमार्फत,फायनान्स कंपनीमार्फत होणाऱ्या छळाची सोडवणूक करणे,जनतेच्या नागरी सुविधा व न्याय हक्कासाठी व भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठवून लढत राहणे आदी कार्य करीत असताना विनाकारण खोटे आरोप करून गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे त्यानाही मन:स्ताप करण्याची वेळ आली आहे.हेतुपुरस्सर दाखल केलेल्या गुन्ह्याची सत्यता पडताळणी करावी असे निवेदन निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने बुधवारी देण्यात आले आहे.तसेच निवेदन कोतवाली पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर,शहर वाहतूक नियंत्रण शाखा[पोलीस ठाणे]यांना देण्यात आले आहे.
दिनांक २६ में २०२५ रोजी अहिल्यानगर येथील जी.पी.ओ चौकात घडलेल्या असत्य घटना व आम्ही फेसबुकवर लाइव्ह केलेल्या घटनेचा व्हिडीओ पाहता पोइस महिला कर्मचारी वाहतूक नियंत्रक विभाग अहिल्यानगर जयश्री सुद्रिक यांनी पक्षाचे कार्यकर्त्यावर कोतवाली पोलीस स्टेशनला खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे.असे पदाधिकारी यांना दि.१८ जूनच्या वर्तमान पत्राव्दारे समजले.परंतु अशा प्रकारे कोणताही गुन्हा घडला नाही.पदाधिकारी यांनी ज्यांचे भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली आहेत.त्यांनी सदर महिला कर्मचारी बरोबर संगनमत करून पदाधिकारी यांना या गुन्ह्यात अडकविण्याचा हेतूने गुन्ह्याची नोंद केली आहे.त्या घटनेचा कोणाशी संबंध नाही.त्या कर्मचाऱ्याला कोणीही मानसिक अथवा शारीरिक त्रास दिला नाही.सदर ठिकाणी जाम झालेली वाहतूक सुरळीत करण्यासठी सहकार्य करीत होतो.त्याचे चित्रण आमचेकडे आहे.त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता.त्यावरून देखील आमचा निर्दोषपणा दिसून येईल.पोलीस अधीक्षक यांनी आमच्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून व आमचा पुरावा ग्राह्य धरून आमचे विरुद्ध दाखल केलेला कपोलकल्पित खोटा गुन्हा रद्द व्हावा व आम्हास न्याय मिळावा.अशी मागणी जिल्हाध्यक्ष शीतल गोरे व पदाधिकारी यांनी केला आहे.निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री. महाराष्ट्र, जिल्हाधिकारी,पोलीस निरीक्षक वाहतूक,पोलीस निरीक्षक कोतवाली पो.स्टेशन आदींना देण्यात आले आहे.