

हृदयविकाराच्या प्रमाणात अपेक्षे पेक्षा अधिक वाढ”
कोरोना,पर्यावरण बदल एक कारण,परंतु भेसळी मुळेच मृत्यू प्रमाण अधिक.!
दिनचर्या बदल,व्यायमाची कमी,
पश्चिमात्य आहार विहाराचे अनुकरण,ही कारणे असतीलही,परंतु आज अधिक जीवित हाणी भेसळ मुळेच अधिक होत आहे हे सत्य नाकारता येत नाही.
पुर्वी सरकार व्दारा विशिष्ट विभागाद्वारा निर्माता, विक्रेता,साठेबाजी,व ईतर जीवणाश्यक वस्तुंचे वर सरकारचे कायम नियंत्रण असायचेच, भेसळचे प्रमाणापेक्षा अधिक सापडल्यास हमखास शिक्षा व्हायची,त्या मुळे व्यावसाईक नियमात राहूणच आपले व्यवसाय करायचे,परंतु आज ऊलट पहायला मिळत आहे.समंधित विभाग आहेत, परंतु कार्यावाही शुण्य,सरकार चे आनलाईन प्रणाली मुळे नियंत्रण तर सुटले नाही ना?मग व्यापारी,पुंजीवादी वाटेल तसे का वागत आहेत,(सत्य घटना शेकडो दाखविता येतील)सामान्य व्यक्तीला कळते आहे, भ्रष्टाचार होतो आहे,मग शासन अनभिज्ञ का.? समंधित कार्यालय आहेत.हे जनता विसरलीच,कारण अधिकारी कार्यालयात दिसतच नाहीत,कार्यालय कोणत्याही विभागाचे असो,एखादा व्यक्ती खुर्चीवर बसला असतो,त्याला काही विचारले आधी उत्तरच देत नाही,नंतर मोबाईल मधुन डोक काढुन उत्तर देतो”ईथे कशाला आला,सर्व आनलाईन आहे”अगर असे असेल तर जनतेच्या मेहनतिच्या पैशातुन पांढरे बिनकामाचे हत्ती पोसायचे कशासाठी. वर्तमान सरकार मधिल आमदार,खासदार, यांनी जनतेला कधीच विश्वासात न घेता आपले पगार, पेंशन,वैद्यकिय व ईतर खर्च जनतेच्या पैशातुन कायम वाढवून घेतले,हे कितपत योग्य व देश हिताचे आहे, लक्षात असो व्यापार हा जरी नफा कमविण्यासाठी असला तरी भेसळ,मिलावट,मुळे जनतेच्या जीवीताची कायम हाणी होणे कदापीही योग्य नाही.“व्यापार करतांना स्वहिता बरोबरच जनहित लक्षात घेतले गेले पाहीजेतच,असे होत नसेल तर अशा वेळेस शासनाने आपली जबाबदारी योग्य रितीने,तातडीने पार पाडली पाहीजेत. तरच भेसळयुक्त जीवनावश्यक वस्तु मुक्त राहुन,वैद्यकिय प्रणाली,व देशावर विनाकारण दबाव पडणार नाही,जनता निरोगी,दिर्घायुषी राहील यात शंका नाही.