ताज़ा खबर

सोनिया गांधी तिसऱ्यावेळी राहुल बाबाला लॉन्च करण्याचा प्रयत्न – केंद्रीय मंत्री अमित शहा

त्यांना त्यांच्या मुला-मुलींना मुख्यमंत्री बनवायचं

जळगाव:- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांची जळगावात जाहीर सभा पार पडली. सभास्थळी हजर असलेल्या युवकांना संबोधित करताना अमित शाह म्हणाले, भाजपला मत म्हणजे तरुणांच्या उज्ज्वल भविष्याला मत. भाजपला मत म्हणजे महान भारताच्या रचनेला मत. शिवाजी महाराजांनी स्वकीय भावना निर्माण केली. देश आज जो उभा आहे त्याची पायाभरणी शिवाजी महाराजांनी केली आहे. २०२४ च्या निवडणुकीच्या बाबतीत बोलण्यासाठी मी आलोय. मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी मतदान आहे. या गैर समजात राहू नका. २०२७ ला विकसित भारत बनविण्यासाठी मतदान आहे. भविष्यासाठी मतदान आहे, युवकांच्या भविष्यासाठी मतदान आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी, शरद पवारांसह महाविकास आघाडीवर सडकून टीका आहे. इंडिया आघाडीतले सर्व पक्ष घराणेशाही मानणारे आहेत. जे पक्ष आपल्या पार्टीत लोकशाही नाही, तर परिवारवादाच्या पार्टीत आहेत. त्या देशात ते लोकशाही ठेवू शकतील का? उद्धव ठाकरेंना आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचंय, शरद पवारांना आपल्या मुलीला मुख्यमंत्री बनवायचे आहे. त्यांना त्यांच्या मुला-मुलींना मुख्यमंत्री बनवायचं, तुमच्यासाठी काही नाही. तुमच्यासाठी फक्त मोदी आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.

पुलवामामध्ये आतंकवादी आलेत. 10 दिवसांत पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्टाईक केले. काश्मीर आपला हिस्सा आहे की नाही. 370 कलम 70 वर्ष काँग्रेसने हटविले नाही. मोदींना दोनदा पंतप्रधान केले. त्यांनी 370 हटविले. राहुल गांधी म्हणत होते खून की नदीया येतील. पण खून की नदी सोडा साधा दगड उचलण्याची हिंमत नाही झाली, अशी टीका राहुल गांधींवर केली.

Back to top button
error: Content is protected !!