
कात्रज सातारा रोडवरील दुहेरी वाहतूक असणारा अरुंद रस्ता असून या ठिकाणी दैनंदिन ट्रॅफिकची समस्या निर्माण होत आहे. यामध्ये प्रामुख्याने या रस्त्यावर अपुरे बंद पडलेले पावसाळी लाईनचे काम, खोदून ठेवलेला रस्ता व रस्त्यात साठलेले पाण्याचे डबके व त्यामुळे पडलेले मोठमोठे खड्डे पुणे महानगरपालिकेतील स्थानिक विभाग अधिकारी तसेच उच्च अधिकारी यांना याची माहिती वारंवार दिलेली असून सुद्धा पालिकेकडून कुठलीही दखल घेतलेली पाहायला मिळत नसून नुसती बघायची भूमिका घेत असलेली महानगरपालिकेतील विभाग अधिकारी यावर संतप्त प्रक्रिया म्हणून शिवशंभु प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेशभाई कदम व स्थानिक रिक्षा चालकांनी पुढाकार घेऊन या रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला. यापुढे तरी महानगरपालिकेने तात्काळ अशा गोष्टीचे दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून व शिवशंभु प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष महेश भाई कदम यांच्याकडून करण्यात येत आहे.