

लांडेवाडी गावात भर दिवसा बिबट्या फिरत असून लोक दिवसा शेतात जायला घाबरतात. तीन दिवसापूर्वी चासकरमळा येथे बिबट्याने तीन लोकावर हल्ला केला असून, काही महीन्यापूर्वी लांडे मळ्यातील दोन लोकावर बिबट्याने हल्ला केला, असून आजून किती लोकांचा अंत बघायचाय वनविभागाने प्रत्येक मळ्यात, पिंजरा लावावा व बिबट्याला जेरबंद करावा, आई बहिणी शेतात काम करायला घाबरतात वनविभागाने पिंजरा लावून बिबट्या बंद करावा अशी मागणी रयत कामगार संघटना अध्यक्ष काळूराम लांडे यानी केली. अनेक कामगार रात्रीचे कामावरून टू व्हिलरवर ये जा करतात अनेकांच्या जीवितास धोका असल्याने तात्काळ बिबट्या जेरबंद करावा. अशी मागणी करण्यात येत आहे.










