
पुणे ट्रॅफिक डिव्हिजन कडून सक्तीचे नो एन्ट्रीमध्ये शिरणाऱ्यांनसाठी कडक नियमावली लागू करण्यात आली असून कात्रज जवळील आंबेगाव अभिनव कॉलेजच्या समोरील रस्ता रुंदीकरणाचे काम चालू आहे. नवले कात्रज बायपास जाणाऱ्या रस्त्यामध्ये अभिनव कॉलेज समोरून चिंतामणी स्कूल व रिद्धी सिद्धी आंबेगाव या ठिकाणाहून येणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असून आसपास शाळा, कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेज व त्याच परिसरामध्ये कमर्शियल एरिया असल्याकारणाने रिद्धी सिद्धी चिंतामणी स्कूलच्या बाजूने वाहने मोठ्या प्रमाणात येतात त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त वाहनेही नो एन्ट्रीचा बिनधास्तपणे कुठलीही भीती न बाळगता मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. यावर मात्र या भागातील ट्राफिक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र पाहायला मिळाले. याच परिसरामध्ये अनेक एक्सीडेंन्ट होऊन दुर्दैवी मृत्यू झालेले असून देखील ट्राफिक डिव्हिजन कडून दुर्लक्ष का? व या ठिकाणी अशा घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न स्थानिकांकडून विचारण्यात येत असून वाहन चालकांनी या ठिकाणी होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी या नो एन्ट्रीचा वापर टाळावा असेही स्थानिक काम करून आव्हान करण्यात आले.





















